राज्य सरकारनं गरीब आणि गरजू महिलांसाठी एक खूप चांगली योजना जाहीर केली आहे – मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2025. या योजनेत महाराष्ट्रातील पात्र महिलांना दरवर्षी 3 मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत. ही योजना फक्त महिलांसाठी आहे, ज्यांना स्वयंपाक करताना स्वच्छ इंधनाची गरज असते.

ही योजना जुलै 2024 पासून चालू झाली आहे. 2024 चा अर्थसंकल्प जाहीर करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेची घोषणा केली होती. राज्यातील हजारो महिलांना याचा फायदा होणार असून यामुळं त्यांना गॅससाठी पैसे खर्च करावे लागणार नाहीत. म्हणून त्यांच्या घरखर्चात मोठी बचत होईल.
3 मोफत गॅस सिलेंडर- Free Gas Cylinder
ज्या महिलांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमधून आधीच गॅस कनेक्शन मिळालं आहे, त्यांना या योजनेचा थेट फायदा मिळणार आहे. तसेच “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेच्या लाभार्थी पात्र महिलांनाही ही योजना दिली जाणार आहे. यामुळं सुमारे 52 लाख कुटुंबांना दरवर्षी 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत.
मोफत सिलेंडर मिळण्यासाठी महिलांनी वेगळा अर्ज करण्याची गरज नाही. ज्या महिलांनी आधीपासून आधार कार्ड, उज्ज्वला योजनेचं कनेक्शन आणि बँक खाते जोडलेलं आहे, त्यांच्याच खात्यावर सिलेंडरसाठीचे पैसे जमा केले जातील. म्हणजे गॅस सिलेंडर घेतल्यावर पैसे भरावे लागतील, पण काही दिवसांत सरकारकडून ते पैसे खात्यावर परत दिली जाईल.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना : PM Vishwakarma Yojana 2025 in Marathi
प्रत्येक सिलेंडरवर केंद्र सरकार 300 रुपये आणि राज्य सरकार 530 एवढी सबसिडी देते. यामुळे महिलांना सिलेंडर मोफत मिळतो. एक सिलेंडर साधारण 830 ते 850 रुपयांच्या आसपास येतो. या योजनेंतर्गत वर्षाला 3 सिलेंडर मोफत मिळाल्याने तुमची 2500 रुपयांपर्यंत ची बचत होईल.
या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना स्वच्छ इंधन देणं आणि त्यांचं आरोग्य सुधारणे हा आहे. अजूनही अनेक ठिकाणी महिलांना चुलीवर स्वयंपाक करावा लागतो, त्यामुळे त्यांना धुराचा त्रास होतो. ही योजना त्यांच्यासाठी एक वरदान ठरणार आहे. त्यामुळे महिलांच्या आरोग्याची आणि वेळेची दोन्हीची बचत होईल
या योजनेमुळे केवळ आरोग्य नाही, तर आर्थिकदृष्ट्याही फायदा होतो. कारण गॅसचे दर सतत वाढत असतात, आणि अशा काळात मोफत सिलेंडर मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याशिवाय महिलांना स्वयंपाकासाठी सुरक्षित व स्वच्छ पर्याय मिळतो. ही योजना म्हणजे महिलांसाठी आत्मनिर्भरतेकडचं एक मोठं पाऊल आहे.
जर तुमच्याकडे उज्ज्वला योजनेचं आधीचे कनेक्शन असेल, आणि तुम्ही “माझी लाडकी बहीण” योजनेचा लाभ घेत असताल, तर ही योजना तुमच्यासाठी लागू होते. त्यासाठी काही वेगळ्या कागदपत्रांची गरज नाही. फक्त आधार, उज्ज्वला कनेक्शन आणि बँक खातं जोडलेलं असणं आवश्यक आहे. तुमच्या सिलेंडरची किंमत तुमच्या खात्यावर जमा केली जाईल.
जर अजूनही काही महिलांनी उज्ज्वला योजना घेतली नसेल, तर त्यांनी जवळच्या गॅस एजन्सीकडे संपर्क साधून कनेक्शन घ्यावं. त्यानंतर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ आपोआप मिळू लागेल. या योजनेसाठी कोणतीही फी नाही. सरकारी पोर्टल किंवा अधिकृत CSC केंद्रांवरून सुद्धा याची माहिती मिळू शकते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी स्वतः पुढाकार घ्यावा. एकदा नाव या योजनेत आले की, दरवर्षी 3 सिलेंडर मोफत मिळतील. यातून केवळ घरखर्चाची बचत होणार नाही, तर स्वयंपाकाची प्रक्रिया सोपी आणि धुराशिवाय होईल.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही गरजू महिलांसाठी खूप मोठी योजना आहे. राज्य सरकारने एक पाऊल पुढे टाकून त्यांच्या जीवनात फरक घडवण्याचा प्रयत्न केलाय. आता गरज आहे ती फक्त महिलांनी 3 मोफत गॅस सिलेंडर लाभ घ्यायची. त्यामुळे ही माहिती इतर महिलांपर्यंत पोहोचवा. ज्यांना गरज आहे, त्यांनी वेळ न घालवता मोफत गॅस सिलेंडर योजने चा लाभ घ्या.