Solar Pump Best Company in Maharashtra 2025 – महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी सरकारकडून मागेल त्याला सौर पंप योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर Solar Water Pump दिले जातात. पिकांना पाणी देण्यासाठी डिझेल किंवा वीजेवर अवलंबून न राहता, सूर्यप्रकाशावर चालणारे पंप शेतकऱ्यांना दिलासा देतात.

सरकारने काही नामांकित कंपन्यांना अधिकृत Vendor म्हणून निवडलं आहे. पण प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात प्रश्न असतो – “सौर कृषी पंप कोणत्या कंपनीचा सर्वोत्तम?”
या पोस्ट मध्ये आपण आपण Maharashtra मधील Solar Pump कंपन्यांची माहिती, त्यांची सेवा, गुणवत्ता, शेतकऱ्यांचा अनुभव, तसेच निवड करताना काय बघायचं हे पाहणार आहोत.
Solar Pump Best Company – पुरवठादार (Vendor) कंपन्या
1. CRI Pumps Pvt. Ltd.
- ही सोलर कंपनी सर्वात मोठी पुरवठादार आहे.
- अनेक शेतकऱ्यांना CRI चे सौर Pump मिळाले आहेत.
- या कंपनीकडून Smart (IoT) सौर पंप दिले जातात.
- यांची Services चांगली असून, पंपांची Quality आणि Performance टिकाऊ आहे.
- शेतकऱ्यांच्या मते CRI पंपांचा वापर करताना कसलाही त्रास होत नाही.
2. Alpex Solar Ltd.
- ही कंपनी Solar panels आणि पंप पुरवते.
- यांची कंपनीची Price इतरांपेक्षा थोडी कमी असते.
- पंपाचा दर्जा चांगला आहे, आणि कंपनीची Services देखील समाधानकारक आहे.
- या कंपनीने थोड्या वेळात अधिक Project पूर्ण केले आहेत.
सौर कृषी पंप दुरुस्ती साठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा? कुठे करायचा?
3. Shakti Pumps India Ltd.
- Shakti कंपनी बेस्ट असून, महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये Shakti पंप वापरला जातो.
- या कंपनीचे सोलर पंप दीर्घकाळ चालतात आणि Maintenance व्यवस्थाही आहे.
- या कंपनीचे Installation चांगले आहे असे शेतकरी सांगतात.
- महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये या कंपनीचे पंप जास्त प्रमाणात वापरले जातात.
4. Tata Power Solar, Rotomag Motors, Gk Solar आणि इतर कंपन्या
- या कंपन्याही शासनाच्या यादीत Included आहेत.
- प्रत्येक कंपनीचा Experience जिल्ह्यानुसार वेगळा असतो.
- काही ठिकाणी Tata Power चे पंप चांगले चालत आहेत, तर काही भागात कमी Response आहे.
प्रमुख Solar Pump कंपन्या – तुलना
| कंपनीचे नाव | वैशिष्ट्ये | शेतकऱ्यांचा अनुभव | सेवा केंद्रांची उपलब्धता |
|---|---|---|---|
| CRI Pumps | IoT आधारित, टिकाऊ पंप | Positive | राज्यभरात उपलब्ध |
| Alpex Solar | परवडणाऱ्या किंमती, जलद प्रकल्प | समाधानकारक | अनेक जिल्ह्यांत |
| Shakti Pumps | दीर्घकाळ टिकणारे, मजबूत network | Highly Positive | Maharashtra मध्ये जास्त |
| Tata Power Solar | ब्रँड मोठा, mixed response | भागानुसार बदलतो | निवडक जिल्हे |

सोलर कंपनी निवडताना काय बघायचे
शेतकऱ्यांनी Solar Pump Best Company निवडताना खालील बाबी बघा
Services
कंपनीने पंप लावल्यावर तांत्रिक बिघाड झाल्यास किती वेळात Services मिळते, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
Quality
पंप किती वर्षे टिकतो, त्याची Efficiency काय आहे?
Guarantee
पंपाला किती वर्षांची Guarantee आहे? Panel व Motor वेगवेगळ्या कंपनीच्या आहेत का?
Local Office
तुमच्या जिल्ह्यात कंपनीचं Office किंवा Service Center आहे का?
Farmers Experience
शेजारील शेतकऱ्याने कोणत्या कंपनीचा पंप घेतला असेल, तर त्यांच्याकडून अनुभव घ्या.

सेवा का महत्त्वाची आहे?
सौर पंप हे दिवसा उन्हावर चालतात. जर सोलर Pump खराब झाला, किंवा काम करत नसेल, तर तुम्हाला पिकाला पाणी देण्यास अडचण येते. त्यामुळे कंपनीची वेळेत Services मिळणं खूप महत्त्वाचे आहे.
शक्यतो अशा कंपनीचा पंप निवडा, जिचं Office तुमच्या जिल्ह्यात आहे आणि जी Phone किंवा WhatsApp वर लगेच उत्तर देते.
अनुदान किती मिळते?
- Scheduled caste / Tribe शेतकऱ्यांना फक्त 5% Amount भरावी लागते.
- इतर General वर्गासाठी 10% Amount भरावी लागते.
- उरलेली Amount राज्य आणि केंद्र सरकारकडून अनुदान स्वरूपात भरली जाते.
Solar Pump Best Company कोणती निवडावी
सर्व कंपन्या शासनमान्य आहेत, त्यामुळे त्या टाळण्यासारख्या नाहीत. पण तुमच्या भागात ज्या कंपनीच्या पंपाचा प्रत्यक्ष अनुभव चांगला आहे, जिची Services वेळेवर मिळते, त्याच कंपनीला निवडणं फायद्याचं ठरेल.
CRI पंप, Shakti पंप, आणि Alpex सौर या कंपन्या सध्या शेतकऱ्यांमध्ये सर्वाधिक Popular आणि Solar Pump Best Company आहेत.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
प्रश्न 1: Maharashtra Solar Pump Yojana 2025 साठी अर्ज कुठे करावा?
उत्तर: अर्ज Mahavitaran Portal किंवा MahaDBT पोर्टलवर ऑनलाइन करता येतो.
प्रश्न 2: Solar Pump साठी किती अनुदान मिळतं?
उत्तर: SC/ST साठी 95% आणि इतर शेतकऱ्यांसाठी 90% अनुदान सरकारकडून मिळतं.
प्रश्न 3: Solar Pump किती वर्षे टिकतो?
उत्तर: साधारण 15–20 वर्षे पॅनल चालतात, तर मोटर 7–10 वर्षे व्यवस्थित काम करते.
प्रश्न 4: Solar Pump कंपनी निवडताना काय बघावे?
उत्तर: सेवा केंद्र, हमी, शेतकऱ्यांचा अनुभव आणि स्थानिक उपलब्धता महत्त्वाची आहे.
प्रश्न 5: कोणत्या कंपन्या महाराष्ट्र सरकारकडून मान्य आहेत?
उत्तर: CRI, Alpex, Shakti, Tata Power Solar, Rotomag, GK Solar या प्रमुख कंपन्या शासनाच्या यादीत आहेत
conclusion
Solar Pump Best Company in Maharashtra 2025 निवडणं ही एक मोठी गुंतवणूक आहे. कंपनी मोठी असली तरी जर सेवा वेळेवर मिळाली नाही तर फायदा नाही. त्यामुळे निर्णय घेताना स्थानिक अनुभव आणि सेवा महत्त्वाची ठरते.
शेतकऱ्यांनी CRI, Shakti किंवा Alpex यांसारख्या कंपन्यांना प्राधान्य द्यावं, कारण त्यांची सेवा व पंपांची गुणवत्ता सिद्ध झालेली आहे.
तुम्हाला Solar Pump Best Company विषयी अधिक माहिती हवी असेल, तर महावितरण च्या पोर्टलवर जाऊन कंपनीची यादी बघा तसेच स्थानिक अधिकारी किंवा CSC केंद्रावर जाऊन Guidance घ्या.
